अंदाजामागे त्यांनी उन्हाळ्यातील पावसाची (अवकाळी) स्थिती हे एक प्रमुख कारण दिले आहे. त्यांचे विश्लेषण आहे की, जर गुढी पाडव्याच्या अगोदर ‘डब्ल्यूडी’ (Western Disturbance) मुळे पाऊस पडला, तर येणारा मान्सून कमजोर होतो. २०२६ चा पावसाळा हा कमी-जास्त प्रमाणात २०२४ सारखा असू शकतो, असा प्राथमिक तर्क त्यांनी मांडला आहे.
२०२६ च्या मान्सूनमध्ये ‘तरसवणाऱ्या’ प्रदेशांमध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, दक्षिण मराठवाडा, आणि दक्षिण महाराष्ट्र यांचा समावेश असेल. पेरणीच्या वेळेस म्हणजेच जून आणि जुलै महिन्यात या भागांना चांगल्या पावसासाठी वाट पाहावी लागेल. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील जुन्नर पट्ट्याची पश्चिम बाजू आणि नाशिकची पश्चिम बाजू वगळता, पूर्वेकडील बाजूंना मान्सूनसाठी जास्त त्रास सहन करावा लागू शकतो.
















